माझी कविता-
देशाचा गरीब सुपुत्र
मीही शिकलो असतो तर
किती चांगलं झालं असत
मीही काहीतरी बनलो असतो
तर किती चांगलं झालं असत
जर एवढी गरिबी नसती आपल्या
देशामध्ये
माझ्या सारखा प्रत्येक बालक
पोट भरून
जेवला असता , तर किती चांगल झालं असत
माझ्या वयाच्या बालकांना
जेव्हा
मनसोक्त खेळताना पाहतो ,
जर मीही मजुरी न करता अस
मनसोक्त खेळलो
असतो , तर किती चांगलं झालं असत
आई बाबा जेव्हा माझी इच्छा
पूर्ण करण्यासाठी
हताशपणे पाहतात एकमेकांकडे ,
तेव्हा मनात विचार येतो मी
जन्माला आलो नसतो
तर किती चांगलं झालं असत
जेव्हा आई उपाशी झोपते ,
मला शिळंपाक खाऊ घालून
तेव्हा मनात विचार येतो मी
श्रीमंत असतो
तर किती चांगलं झालं असत .
विवेक शेळके